Sunday, November 26, 2017

चला स्वयंपाक करूया ...

घरात book असो वा नसो पण एक कूक हवा अशी सध्या बहुतांश घरांची परिस्थिती आहे. नोकरी आणि स्वयंपाक दोन्ही कसा जमणार म्हणून कूक तर हवाच , यात थोडंफार तथ्य आहेच. पण माझ्यासाठी कूक अपरिहार्य असणं ही संकल्पना बऱ्यापैकी नवीन आहे. माझी आई सकाळी ७:४५ वाजता घरातून निघायची. त्याआधी ती २५-३० चपात्या, अर्धा किलो भाजी ,भात अामटी करून निघायची.
आता मात्र आजूबाजूला बघितलं तर वेगळंच चित्र दिसतं. एक दिवस घरातील स्वयंपाकी नाही आली तर लोकांची अगदी तारांबळ उडते . एकदाचही जेवण त्यांना करणं अशक्य वाटू लागतं. पूर्ण दिवसाचा स्वयंपाक एकट्याने करणं कठीण असेल पण एकदाचा स्वयंपाक आता का जमेनासा झालाय? याचं एक कारण तरी आपली स्वयंपाकाबद्दलची मानसिकता. स्वयंपाक म्हणजे एक कंटाळवाणी वेळखाऊ गोष्ट आहे असा समज रूढ होतोय. त्यात "एवढं तू कमावतेस मग तू घरातला स्वयंपाक करत बसणार का?",असले बुरसटलेले विचार. स्वयंपाक करणं आणि कमावणं याचा परस्पर विरोधी समंध आहे असा सामाजिक दृष्टिकोन. आपल्या घरचा स्वयंपाक आपण करणं अगदी " down - market " , " non-glamorous" असा समज धृढ होऊ लागलाय.
या उलट आपण स्वयंपाक करणं याचा एक " stress- buster " म्हणून विचार करायला हवा. मला तरी स्वयंपाक करणं हा मस्त change वाटतो. ऑफिसचं काम दिवसभर असतंच , स्वयंपाक हा वेगळा creative change आहे. साग्र -संगीत स्वयंपाक कठीण आहे. पण सुरुवात करायला दिवसातून एकदा एक सोपा पदार्थ करायला घ्यायला हरकत नाही. तुम्ही म्हणाल घरी माझ्या संपूर्ण दिवसाचा स्वयंपाकी आहे, तर मला काय गरज? आपल्याला स्वयंपाक करायला आला तर आपल्याला एक वेगळा आत्मविश्वास येतो. गरज पडली तर आपल्याला आपण हवं तसं आपल्या चवीप्रमाणे करून घेऊ शकतो.आपल्या घरच्या खाद्य संस्कृतीचा वारसा आपण असाच पुढे नेऊ शकतो.
घरी स्वयंपाक करणं याचे अनेक फायदे आहेत. सुप्रसिद्ध फिटनेस तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांचं म्हणणं हेच आहे,आपलं पिढीजात आणि ऋतूप्रमाणे घरचं जेवण हे आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
माझं हे पोस्ट वाचणाऱ्यांमध्ये अनेक सुग्रणी असतील ज्या अगदी नित्यनेमाने उत्तम स्वयंपाक करत असतील. त्यांच्यासाठी हे पोस्ट नाही आहे. माझ्या आयुष्यात मी माझ्या घरातल्या अशाच सुग्रणींकडुन शिकलेय. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मला हे पोस्ट यासाठी लिहावंसं वाटलं कारण कुठेतरी मला असं वाटतंय की स्वयंपाक करणं ही शिकलेल्या लोकांनी न करण्याची गोष्ट असा समज होत चाललाय . यात काहीच तथ्य नाही. आरोग्य राखायचं असेल तर घरच्या स्वयंपाकाला पर्याय नाही- तुम्ही करा नाहीतर स्वयंपाक्यांकडून करून घ्या. पण वेळे-गरजेला आपल्याला करायला यायला हवाच.
मी सध्या फेसबुक वरती " अंगत -पंगत " नावाच्या ग्रुपची सदस्य आहे. त्या ग्रुपमधील सदस्य छान-छान रेसिपीस share करतात. बघून शिकण्यासारखं असतं . आज मी ग्रुपवरच बघून "वरणफळं " केली. वरणफळं म्हणजे आमटी शिजताना त्यात शंकरपाळीच्या आकाराची कणिक टाकायची.मुलांना द्यायला  अगदी मस्त.  चपाती आणि डाळ  दोन्ही खाल्लं जातं , एका डिशमध्ये.
.- धनश्री

No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...