Showing posts with label मराठीकविता. Show all posts
Showing posts with label मराठीकविता. Show all posts

Saturday, September 15, 2018

Jab I met Shahrukh Khan


"Is it really true?" I thought. "Am I really meeting SRK?" But yes it was true. I got to meet SRK and witness the shoot of BYJUs latest ad thanks to my husband. SRK was literally not even 100 metres away from me during the shooting. But given the rules and the silence that is to be maintained, we were not allowed to meet him during the shooting. We could just watch from a distance. I spent almost 8 hours at the recording studio. Of which watching Shahrukh was hardly for a few hrs. Rest of the time being spent in SRK getting ready and makeup for the various looks. Even in that little time, SRK was a true entertainer. Watching a take and retake of the same ad multiple times was enjoyable only due to Shahrukh.
Finally the moment came.  As Gauri Shinde announced "Pack up", SRK proceeded to move out. The people around (mostly from BYJUs) who were watching him from a distance thronged him. People had got DDLJ posters to get his autograph and all. His bodyguards tried to keep people away as they circled around him. I had a notebook in my hand which contained a collection of my poems in 3 languages written for him. The bodyguards thought I was taking his autograph and wanted to drive me away. I just managed a minute to talk to him and told him this is my gift of multilingual poems for him. He opened the notebook, saw my name there and asked "Dhanashree, can I take this?" I still find this absolutely unbelievable. I didn't tell him my name, he opened the notebook while his bodyguards shooed me away, and thanked me. And just in that moment, my husband managed to click a pic. I did not have the time to buy a fancy greeting card, or a fancy notebook, all I had is good content in my usual notebook. That I could give it to SRK and receive his thanks is something I will remember for a lifetime. The collection of my poems for SRK is as follows -

मन्नत

एक मन्नत मांगी थी खुदा से मैने
कभी मन्नत में रेहनेवाले बादशाह से मिला हमें

कहा खुदा ने थोडा सब्र करो
परदेस के मॅडम tussads वाले बादशहा से पहले मिलो

एक wax statue को बस हम देख सकते हैं
SRK बनने  का फॉर्म्युला थोडी पूछ सकते हैं

'कभी ख़ुशी कभी गम ' मे वक्त निकल गया
' चलते चलते ' एक 'चमत्कार ' हो  गया

बडे बडे शहरो  मे छोटी छोटी बाते होती हैं
 और कभी छोटे छोटे लोगों की बडी बडी ख्वाईशें पूरी होती हैं
हम एक बार जीते हैं एक बार मरते हैं और एक बार King Khan से मिलने  की तमन्ना रखते  हैं

बॉलीवूड के बादशाह से मिलने का मौका आया
एक दिन हम उनसे मिल पायेंगे
ये मैने  सोचा न था
मैने सोचा न था

Leadership
To imagine, To dream, To believe
To change ways and embrace the new
To be unafraid and not fear failure
To be passionate about goals, far and near

To inspire the team to move ahead
And be welcoming and inclusive of ideas that come ahead
Having the diligence to execute
And striking a balance between delegation and 'know it all' attitude

To have a plan to achieve the team goals
And yet accept the uncertainties that come in due course
Let the goals not be limiting
But be the milestones to achieve higher

This is what Leadership is all about
As per IIMBUEspeech by SRK , " naam toh suna hi Hoga"

[This poem is based on Shahrukh khan's speech at IIMBUE, the IIMB leadership summit]

Life Lessons

If you want to do something, do it really well
Put in your full effort, do with full JOSH, SRK tells

Maybe put in a bit of madness to your efforts
Taking your aberrations along, be a 'Deewana' of reaching your destination

Maybe  you may fail,sometimes life may be bad
Have faith, have hope
Continue your efforts, you will get the 'Chamatkaar' results in due course

Let 'fear' not intimidate you
Let 'failures' not deter you
The real 'Baazigar' wins even after failures
Chooses not to be held back by his 'Darr' here

It's ok to be confused
It's ok to be worried
"Kabhi Haa, Kabhi Na"
Let life move at its own pace

In all this, be kind, try helping others
Do everything 'Dil Se' spread love to others

Take happiness and sadness in its ephemeral spirit
Live in the present, because you know 'Kal Ho Naa Ho'

Everything will eventually be ok in the end
If it's not ok, it's not the end
Because ' Picture abhi baaki hain doston'

[ Above poem based on Shahrukh Khan's speech at University of Edinburgh]



From your 'Fan'

I thought it was a 'Chamatkaar'
Am I really meeting 'King Khan'?

The 'Deewana' we grew up seeing
Or the 'Baazigar' we watched as kids

The epitome of acting excellence
The Badshaah of Bollywood

Who spans across generations
From 'Ye kaali kaali aankhen' to 'Lungi Dance' hereto

Absolutely thrilled to meet you
My name is Dhanashree, and I am your 'Fan,'
Bas Aapne naam Nahi suna Hoga..


कोण आहे शाहरुख?

कोण आहे शाहरुख, लेकीने मला विचारलं
तो लुंगी डान्स करतो तोच काय गं , तिने खात्री करु घेतलं

 तो  टी . व्ही . वर पिक्चर मध्ये कसा येतो ? हा तिचा पुढचा प्रश्न
त्याचं ऑफिस तेच का , हे तिचं न संपणारं विचारणं

३ वर्षाच्या लेकीला अजून काय सांगावं
' किंग खान ' किंवा 'बादशाह' म्हणजे काय , हे तिला कस उमगाव

शाहरुख म्हणजे खूप अभ्यासू विद्यार्थी
acting आणि   dance यांचा सतत अभ्यास करणारा निश्चयी आणि मेहनती विद्यार्थी

प्रत्येक चित्रपटात त्याचा जोमाने परफॉर्मन्स देणं
प्रेक्षकांना आनंदी करणं हाच त्याचा एकाची धर्म

हसत खेळत जगावे, हाच त्याचा मंत्र
"जिंदगी नफरत के लिये बहुत कम  होती हैं ", हाच त्याचा कानमंत्र

शाहरुख म्हणजे  शाहरुख म्हणजे शाहरुख आहे
त्याच्या कर्तृत्वामुळे तो बॉलीवूडचा सुपरस्टार आहे

-Dhanashree Joglekar
https://dsaidso.blogspot.com

Thursday, June 7, 2018

हैप्पी बर्थडे सायली राजाध्यक्ष

सायली राजाध्यक्ष या फूड आणि lifestyle ब्लॉगर  यांना  मी follow  करते. मला त्यांच्या लिखाणातला खरेपणा , स्पष्टपणा आणि अर्थातच महिती  खूप आवडते .त्यांचा आज वाढदिवस आहे . त्याबद्दल एक  कविता
कानडी बोलणाऱ्या राज्यात मराठी ऐकणं तसं  दुर्मिळच
कोणीतरी गप्पा मारायला हवंय मराठीत ही इच्छा  सदैव होती मनात
लोणचं महोत्सवामुळे झाली तुमची ओळख
गप्पा मरायला तुमच्या  ब्लॉगपोस्ट यांची  होती मला  सोबत
कधी रोजच्या स्वयंपाकाबद्दल गप्पा
तर कधी साध्या झटपट पदार्थांबद्दल
कधी स्वयंपाकाचं नियोजन तर कधी स्वयंपाकाचं ललित
या गप्पांमुळे झटपट काही मस्त स्वयंपाक शिकले मी खरा
कधी विस्तृत माहिती असणारी प्रवासवर्णन
कधी देश परदेशी असलेल्या  लेखकांनी लिहिलेले लेख  यांच  संपादन
साड्यांच्या गप्पा जणू आम्हाला एक शॉपिंग मॉल मध्ये नेतात
फॅशन करण्याचे नवे आणि सोपे मार्ग सुचवतात
तुमच्या लिहिण्यातला स्पष्टपणा आणि खरेपणा भावला
जे आहे ते अगदी तसंच  सुंदररित्या मांडण्याचा तुमचा  धाडस भावला
तुमचा ब्लॉग वाचून लिहिण्यास येते स्फूर्ती
रेसिपीस करून पाहिल्या तेव्हा नवऱ्याकडून मिळते शबासकी
तुमचा ब्लॉग वाचून मिळणाऱ्या आनंदाचं कांही मोजमाप नाही
हैप्पी बर्थडे म्हणून तुमच्या  ऋणात मी सदैव रहाणं पसंत करीन
You can read Sayali Rajadhyaksha blog here -https://shecooksathome.com
https://sareesandotherstories.blog
-DHANASHREE

Sunday, February 25, 2018

आठवणीतले उखाणे

एक जुनी वही सापडली. आणि त्या वहीत काही सुंदर आठवणी सापडल्या. आमच्या लग्नाच्या वेळेला म्हणजे २०१३ साली लिहिलेले उखाणे त्या वहीत होते. ते आता share करतेय.
iPad वर उडतो angry birds चा थवा
सिद्धेशचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा
Apple च्या macbook वर फुलं वाहते वेचून
सिद्धेशचं नाव घेते सर्वांचा मान राखून
गणेशाला आवडतात दुर्वा शंकराला बेल
सिद्धेशसंगे फुलावी सुखी संसाराची वेल
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण
शिरोडकरांची कन्या झाली जोगळेकरांची सून
चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून
सिद्धेशचं नाव घेते आग्रह केला म्हणून
-धनश्री

Sunday, February 18, 2018

खाद्यसंस्कृती कालची व आजची

दादर भगिनी समाज येथील वक्तृत्व स्पर्धेत मी भाग घेतला होता. त्या स्पर्धेत मला तिसरं पारितोषिक मिळालं. मी " खाद्यसंस्कृती कालची व आजची" या विषयावर बोलले. तेच भाषण मी आता share करतेय. आयत्यावेळच्या विषयावरून जे वक्तृत्व होतं त्यात मला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं . त्याचा विषय होता" valentine डे" ते विचार नंतर share करेन.

खाद्यसंस्कृती कालची व आजची

मर्ढेकर म्हणाले होते-
"आज होईल का गोड माझ्या हाताची भाकर
आज येतील का मोड माझ्या वालांना चांगले
आज होतील का खुश माणसं गं जेवताना"

हा विचार स्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असेलच मग तो स्त्री असो किव्वा पुरुष. आपण केलेला स्वयंपाक चांगला व्हावा आणि त्यांनी लोकं तृप्त व्हावीत हे कोणाला वाटणार नाही.
" हे नाही खाल्लंत  तर काय खाल्लंत  " अशी जाहिरात आस्वाद आपल्या तिळगुळ आणि पुरणपोळी आईसक्रीमची करतंय. आपण तिळगुळ आणि पुरणपोळी तर खातोच. पण त्याचं आज आईसक्रीमसुद्धा बनवलं जातंय. हेच आपल्या सतत बदलत असणाऱ्या खाद्यसंस्कृतीचं ताजं उदाहरण आहे .प्रसिद्ध फूड ब्लॉगर सायली राजाध्यक्ष म्हणतात "खाद्यसंस्कृती म्हणजे नेमकं काय? फक्त खाद्यपदार्थ? तर नाही. माझ्या मते खाद्यसंस्कृती म्हणजे एखाद्या प्रदेशातले खाद्यपदार्थ, ते तयार करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ, त्यांची पैदास,  त्यावरून तयार झालेल्या म्हणी, प्रथा आणि परंपराही. या सगळ्यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती असं मला वाटतं. "

पूर्वी प्रत्येक घरात त्या-त्या कुटुंबाचे किंवा  जातीचे   पदार्थ केले जायचे. बाहेर जाऊन हॉटेलिंग करण्याचं प्रमाण फारच कमी होतं. बाहेरचं खाणं म्हणजे वाईट असेच संस्कार असायचे. आता बघाल तर प्रत्येक घरात पारंपरिक पदार्थांबरोबर थोडे वेगळे पदार्थसुद्धा बनवले जातात. पिझ्झा, पास्ता, chinese हे आज मराठी घरात सर्रास बनवले जातात.  सोयीनुसार आपण पाश्चात्य देशांप्रमाणे दूध आणि कॉर्न फ्लेक्ससुद्धा खायला लागलो आहोत. माझंच सांगायचं तर मी माहेरची सारस्वत आहे आणि लग्नानंतरची कोकणस्थ ब्राह्मण. माझी खाद्यसंस्कृती ही या दोन्ही खाद्यसंस्कृतीचा मेळ आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृती ही एक अव्याहत सुरु असणारी प्रक्रिया आहे.

पूर्वी म्हणाल तर स्थानिक आणि ऋतूनुसार खाण्यास प्राधान्य होते. "Freezing " या संकल्पनेचा शोध न लागल्यामुळे त्या ऋतूच्या फळभाज्या "Freezer " मध्ये ठेवणेही शक्य नव्हते. कोकणातला माणूस नराळयुक्त पदार्थ खायचा आणि देशावरचा माणूस दाण्याच्या कुटायुक्त. काळानुसार हे चित्र बदलत गेलं."Storage Processing technology"  मधील प्रगतीमुळे अगदी हिवाळ्यातले कोवळे मटार फ्रीझर मध्ये ६-६ महिने ठेवता येऊ लागले. पण परत आता बघाल तर "eat local" या संकल्पनेला महत्त्व येत आहे. सुप्रसिद्ध फिटनेस तज्ञ ऋजुता दिवेकर यांचा याच संकल्पनेवर भर आहे. त्या म्हणतात "Eat what your grandmother ate" . याचं कारण असा की पिढ्यानपिढ्या तुमचं कुटुंब जर ते खात असेल तर ते तुमच्यासाठी पोषक असणारच. त्यामुळे कालची संस्कृती परत आजची संस्कृती होते आहे.

पूर्वी एखादी पाककृती शिकायची म्हणजे एकतर ती आई- आजीच्या हाताखाली शिकायची  किंवा पाककृतीच्या पुस्तकातून. हल्ली मात्र या पाककला शिकण्याच्या पद्धतीत फारच बदल झाले आहेत. आजकाल youtube videos आहेत पाककला शिकवणारे, फूड ब्लॉग्स आहेत, आणि पाककला  किंवा खाण्याशी निगडित फेसबुक ग्रुप्स ही आहेत. अंगत- पंगत हा असाच एक फेसबुक ग्रुप. इथे पारंपरिक महाराष्ट्रयीन रेसिपीस बद्दल चर्चा होते. या ग्रुपमध्ये गावांदेआजींच्या रवा खावा नारळांच्या लाडवांची रेसिपी share झाली. आणि लोकांनी त्याला भरपूर प्रतिसाद दिला. लोकांनी ते लाडू करून पहिले , इतकं की त्यामुळे गवांदे आजींच्या पुस्तकाची  चर्चा वाढून त्याचा खप खूप वाढला.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. गावा- शहराबाहेरचा नातेवाईक - मित्र जेव्हा घरी यायचा तेव्हा तो तिकडे त्याचा कोण ओळखीचा आहे त्याच्याकडे जेवायचा. अगदी लांबच्या ओळखीतली लोकसुद्धा हक्काने जेवायला यायची. हल्ली मात्र एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. प्रत्येकजण आपल्या व्यवसायात इतका व्यस्त असतो की एकमेकांकडे जाऊन जेवणं अगदी कमी होत चाललंय. हल्ली मात्र जेवायला बोलावण्याच्या पद्धतीत एक नवीन प्रकार आलाय तो म्हणजे पॉप अप किचन.पॉप अप किचन म्हणजे आपण अशा लोकांना जेवायला बोलवायचं ज्यांना आपण ओळखतोच असं नाही. आपण कुठला स्वयंपाक करणार ते ठरवायचं आणि त्याची तारीख आणि किंमत social media वरून जाहीर करायची. पॉप अप किचन मध्ये आपल्याला त्या विशिष्ट खाद्यसंस्कृतीचा घरगुती अनुभव घेता येतो. त्या खाद्यसंस्कृतीबद्दल अधिक जाणून घेता येतं.

पूर्वी जेवण सजावटीला फारसं महत्त्व नव्हतं. सजावट ही केवळ नैवेद्याच्या ताटाची किंवा केळवणाच्या पानाची केली जायची. हल्ली मात्र फूड स्टायलिंगला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. कुठलाही पदार्थ दिसताक्षणी खावासा वाटावा हा फूड स्टायलिंगचा उद्देश असावा. खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करून त्याची छायाचित्र काढणं हे food stylist आणि फूड फोटोग्राफरचं काम आहे.

आजच्या खाद्यसंस्कृतीतले आणखी काही प्रकार म्हणजे food walks . वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचीं ओळख व्हावी यासाठी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी food walks आयोजित केल्या जातात. कल्याण करमाकर हे असेच एक फूड ब्लॉगर आहेत जे food walks आयोजित करतात. food walks मध्ये वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतींचीं माहिती आणि ते पदार्थ खाण्याची संधीही मिळते.

कालची आणि आजची खाद्यसंस्कृती यांच्याबद्दल बोलताना आणखी एका गोष्टीचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे " comfort food " . ज्या अन्नाने आपल्याला अगदी तृप्त वाटतं ते म्हणजे "comfort food " . अगदी कितीही वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं तरी जे खावंसं वाटतं ते म्हणजे "comfort food ". उदा. माझं "comfort food " वरण भात आहे.

अजून एका गोष्टीचा उल्लेख करणं महत्त्वाचं ते म्हणजे अन्न किती पौष्टिक आहे याचा विचार व्हायला हवा. जे अन्न खाल ते पारंपरिक असो व मॉडर्न ते पौष्टिक असलंच पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरणाशी सुसंगत असा पौष्टिक आहार असावा.

आजच्या खाद्यसंस्कृतीतील आणखीन एक भाग म्हणजे " food delivery startups" - हे आपल्याला जेवण घरपोच करणारे startups आहेत. आपण त्यांच्या website/ app वर जायचं, तिथे असतील त्या रेस्टॉरंट्स मधून खाणं ऑर्डर करायचं. यातले ubereats, swiggy, foodpanda काही startups आहेत.अशी खाद्यसंस्कृती यायला बरीच कारणं आहेत- हल्ली पुष्कळ प्रमाणात तरुण वर्ग कामानिमित्त बाहेर पडतो आहे.paying guest  किंवा sharing मध्ये राहत असताना सगळं स्वयंपाक घरी करणं शक्यच असतंच असा नाही. याने अनेक प्रश्न निर्माण होतात- असं सर्रास बाहेरचं खाणं ऑर्डर केलेलं बरं का? भारतात हल्ली diabetes  आणि हृदयरोगाचं प्रमाण फार वाढतंय. त्याला आपला आहारसुद्धा काही अंशाने जबाबदार आहे. तो सुधारायला हवाच. कुठलीही खाद्यसंस्कृती निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असावी. ती कालची असो व आजची - ती निरोगी आयुष्याची असावी. यावरूनच सांगते- लहानपणापासूनच आमच्या घरी घरचं खाणं आणि चौरस आहार यावर भर होता. घरची संस्कृती तशीच असल्यामुळे असेल कदाचित- माझी आजी जेव्हा ९२व्या वर्षी गेली तेव्हासुद्धा ती बऱ्यापैकी निरोगी होती. माझे सर्वात मोठे काका सध्या ९४ वर्षाचे आहेत, आणि बऱ्याच आत्या ७० च्या पुढे आहेत.या वयातसुद्धा त्या स्वयंपाक स्वतः करतात आणि वयाच्यामानाने बऱ्यापैकी ठणठणीत आहेत. याचं कारण म्हणजे ते फक्त घरचं अन्न खातात. आणि मी माझं नशीब समजते की माझ्या अडीच वर्षाच्या मुलीला असं घरचं जेवण म्हणजे पोळी, भात , लाडू आवडतो. रात्री तर भाताशिवाय ती झोपूच शकत नाही.

माझ्या भाषणाचा समारोप मी एका कवितेने करते. ही कविता मीच बनवली आहे.

खाद्यसंस्कृती कालची व आजची, असो ती कधीची
चवदार खाणं मिळो ही इच्छा आहे मनाची

वरणफळं म्हणा वा म्हणा इंडियन पास्ता
भाजी पोळी म्हणा वा म्हणा फ्रँकी
नावात काय आहे , पोटोबा चवीचा भोक्ता

या घरी जेवायला असे द्या निमंत्रण
किंवा पॉप अप किचनचं फेसबुकवर करा चित्रण
खाद्यसंस्कृतीची ओळख आणि पोटाची भूक हेच आमचे धोरण

नैवेद्याचे ताट दिसे सुंदर
cake वर फॉन्डन्टचे डिझाईनही दिसते उत्तम
"food styling " याच कलेचे नाव असे आजतर

रुचिरा होती स्वयंपाक शिकवणारी आई
youtube , फूड ब्लॉग, फेसबुक ग्रुपने स्वयंपाक शिकणं सोपं केलं ग बाई

खाद्यसंस्कृती कालची असो व आजची
पौष्टिक खाणं खावे हेच ब्रिदमंत्र धरावे उराशी

- धनश्री
(या भाषणात वापरल्या जाणाऱ्या काही माहितीचा संदर्भ- सायली राजाध्यक्ष यांचा ब्लॉग, त्यांचे लिखाण, अंगात पंगत या facebookgroup वरील चर्चा)

Wednesday, January 3, 2018

आजी गं आजी- A tribute to my grandmother


This poem to dedicated to my Aaji(grandmother)Saraswati Shirodkar. Born and brought up in Konkan , she came to Mumbai at the age to 60 to raise her grandkids. At that age, Mumbai was a total culture change for her. Yet from what I know, she adapted swiftly without creating any noise. She paid a pivotal role in our upbringing along with my parents and aunt . What they have done cannot be summarized by one poem . But this is my one small way of paying a tribute to my aaji.

आजी गं आजी , कुठे आहेस गं तू ?
आठवण येते तुझी , परत येशील का गं तू ?
बांद्याचा जन्म तुझा, वेंगुल्यात सासर
नातवंडांच्या सांभाळासाठी मुंबईला केलस आपलं घर
हुशारी तुझी जगावेगळी , शिस्त तुझी चोख आणि शब्द रोखठोक
त्यामुळेच कदाचित गोड बोलणार्यांना घाबरते आम्ही लोक
मनात एक आणि करताना दुसरं असं कधी केलं नाहीस तू
शब्द राखण्यातच माणसाची wealth दिसते असं कळवून दिलसं तू
“Marketing” पेक्षा Executing वर भर दिलास तू
दर दिवशी त्याचा फायदा होतो आहे बघू
आपल्या माणसांसाठी करण्याला कधी Sacrifice नाही म्हटलेस
“Teamwork” चे धडे घरीच आखलेस
अगं माणसाने समाधानी रहावं असं तू शिकवलसं
“Work-life balance” इथूनचं आम्ही घेतला
इतकं सगळं करून Blow your trumpet नाही केलसं
“Humility” अनुकरण आम्ही इथूनच केलं
कोकण आणि मुंबई येवढचं Exposure असून एवढं कसं केलसं?
वाचन, इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर घर उभं राहिलं
आठवण तुझी येते, तुला भेटावेसे वाटते
सांग आजी तू देवाकडून परत कधी येतेस?

Thursday, November 2, 2017

नवरा बायको हे नातं

नवरा बायको हे नातं तरी काय असतं
वेळ सरता-सरता ते बदलत असतं
लग्न होताच सगळं अगदी मस्त असतं
नवरा बायको नसून ते प्रियकर - प्रेयसीच नातं असतं
समजूतदारपणा दोघांनीही दाखवायचा असतो
एक चुकला तर दुसर्याने सावरून घ्यायचे असते
नवरा बायको म्हणजे तू आणि मी नसतात
एका संसाराची ती दोन चाकं असतात
संसाराची गाडी प्रेमाने चालते
पैसे कमी जास्त झाल्याने फरक पडत नसते
कठीण प्रसंगी एक-मेकांची साथ द्यायची असते
"We are a team" म्हटल्याने सगळे शक्य होते
आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात
लोकांचे फुकटचे सल्ले घ्यायचे नसतात
सुखी संसार लोकांना बघवत नसतात
गैरसमज घडवण्याचे त्यांचे प्रयत्न असतात
नवरा बायको यांचा संवाद सतत चालू राहावा
समाज, गैरसमज यांचा हाच तोडगा असावा
संसारात थोडीशी compromise करावी
"चूक भूल द्यावी
चूक भूल घ्यावी
सात जन्म राजा राणी
परी साथ व्हावी"
- धनश्री

Friday, September 8, 2017

प्रेरणा

प्रेरणा या विषयावर कविता !
प्रेरणा प्रेरणा म्हणजे नक्की काय असतं
आपण जे बघतो त्यातून काही शिकायचं असतं
काळ स्थळ वेळ याला काही महत्त्व नसतं
जे दिसेल त्यातून शिकण्यासाठी मन खुलं असावं लागतं
मीपणा त्यागला तर शिपाईही खूप काही शिकवून जातो
त्याच्या त्या पगारात घर चालवून तो Financial Management शिकवतो
डॉक्टर माणसांचा जीव वाचवतात
नर्स रुग्णांची सेवा करते
एक माणूस बरा होण्यासाठी टीम लागते
कोण मोठा कोण छोटा
टीमवर्क करूनच प्रश्न सुटतात
हीच प्रेरणा आजूबाजूला दिसते
म्हणूनच कधी कोणाला कमी लेखायचे नसते
बाबा आमटे समाजकार्याची प्रेरणा देतात
सुंदर पिचाई उत्तम कंपनी चालवतात
चांगले शिकून , वाईट सोडून द्यायचे असते
प्रेरणा घेण्याचे हेच रहस्य असते
आयुष्य सुंदर आहे, आयुष्याच्या प्रवासात अनेक लोक भेटत असतात
त्यांच्या आयुष्यात ते नक्की काहीतरी चांगलं करत असतात
आयुष्याच्या प्रवासातून खूप काही शिका
अशी प्रेरणा घेत घेत आयुष्याची मजा लुटा
-धनश्री
P.S. ठाणे ते दादर या प्रवासात उत्स्फूर्तपणे सुचलेली कविता . ट्रेन ही खूप काही प्रेरणा देते. त्याबद्दल नंतर कधीतरी.

Thursday, August 31, 2017

रिमझिम पाऊस पडे सारखा

जसा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला ,तसाच अमेरिकेतील Houston मध्ये hurricance Harvey ने धुमाकूळ घातला. मुंबईत मुंबईकरांनी बहुतांश वेळा एकमेकांना मदतच केली. Houston मध्ये मात्र रात्री होणारी लुटालूट थांबवण्यासाठी curfew पुकारावा लागला. तर या पावसावर आणि या परस्पर विरोधी मानवी वृत्तीवर ही कविता. "रिमझिम पाऊस पडे सारखा " या मराठी गाण्याच्या चालीवर आणि शब्दांवर आधारित ही माझी कविता.
रिमझिम पाऊस पडे सारखा
Houston लाही पूर चढे
पाणीचपाणी चहूकडे
ग बाई गेले ऊन कुणीकडे
घरे बुडली , वाहतुक थांबली
Harvey ला सगळी माणसं घाबरली
लुटालुट करायला माणसं सरसावली
दचकून माझा ऊर उडे
ग बाई गेली माणुसकी कुणीकडे
ट्रॅफिक मध्ये माणसं अडकली
कधी पोचू घरी प्रश्नात पडली
साधी माणसं मदतीला आली
Mumbai Spirit यालाच म्हणे
ग बाई मला मुंबईकरांवर भरवसा आहे गडे
रिमझिम पाऊस पडे सारखा
मुंबईलाही पूर चढे
पाणीचपाणी चहूकडे
ग बाई माणुसकी आहे मुंबईकडे
RJ मलिष्काला सांगावसं वाटतं " मुंबई ला मुंबईकरांवर भरोसा हाय"
-धनश्री
My earlier post on Mumbai Rains is here: https://dsaidso.blogspot.in/2017/07/blog-post_26.html

Saturday, August 26, 2017

गणपती बाप्पा मोरया

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. गणपतीचा तो माझा पहिला अनुभव आणि त्यामुळे बरंच काही आठवतं गणपती म्हटलं की. त्याबद्दल काही!

माझ्या माहेरचा गणपती अंधेरीला असतो. तो शिरोडकरांचा गणपती. अंधेरी माझे सर्वात मोठे चुलत काका राहतात. त्यांचा वय वर्ष ९४, माझ्या बाबांपेक्षा ते जवळजवळ ३० वर्षांनी मोठे. त्यांना दोन मुली, एकीच्या घरीच गणपती असतो. त्यामुळे त्या गणपतीची बरीचशी तयारी माझी आई ,बाबा ,काकी आणि आत्या करतात. मलाही जितकं जमणार नाही इतकी चोख तयारी असते. सगळा स्वयंपाक, अगदी मोदकासकट घरी बनवला जातो. जेवायला दुसऱ्या दिवशी, म्हणजे कंदमुळाच्या दिवशी तर कंदमूळ खाण्यासाठी अजून लोक जेवायला असतात.माझ्या आईचा वय ६०च्या पुढे आहे आणि आत्यांची वयं तर ७२-८८ या गटातली. तरीही जेव्हा मी त्यांचा एवढा पूजेची तय्यारी, स्वयंपाक करण्याबद्दलचा वर्षानुवर्षांचा उत्साह बघते तेव्हा नुसतं थक्क व्हायला होतं.एक छोटीशी कविता त्याबद्दल :

गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
आठवणी दाटून आलेल्या
सांगते थोड्या तुम्हाला

गावचो दीड दिवसाचो गणपती
पहिल्यांदा मुंबैक आणलो
गोरेगावक अण्णा आजोबांकडे तो बसयलो

किती तो स्वयंपाक किती ती तय्यारी
सारस्वत जेवणासाठीच जगतात ही खात्री होते पुरी
पहिल्या दिवशी असतात पाच भाज्या आणि मोदक
सगळे मिळून स्वयंपाकाला लागतात पटपट
दुसऱ्या दिवशी मोठा टोप भरून कंदमूळ
वड्यासकट खाताना येते मजा भरपूर

आरतीला शेजारीपाजारी येतात
संध्याकाळी दर्शनासाठी गर्दी करतात
आत्याला भारी उत्साह असतो
वय ७५च्या पुढे असून लाडू चिवडा घरीच बनतो

भावंडांच्या गप्पा रंगतात,एकमेकांबरोबरची नाती अजून घट्ट होतात
गणपती च्या निमित्ताने सगळे एकत्र येतात

तूच कर्ता तूच करविता,
गणपती बाप्पा मोरया
लागतेच तुमच्या तयारीला
गणपती बाप्पा मोरया

-धनश्री
#ganapatibappamoraya #marathikavita #marathipost

Wednesday, August 9, 2017

पुरी ओ पुरी



आज पुऱ्या केल्या. पुऱ्या करताना त्या मस्त छान फुगाव्या असं वाटतं. तर आता पुरी बनवण्यावर एक कविता.

पुरी ओ पुरी, तू फुगशील का बरी
तेल तापलं नसेल तर करशील काय बिचारी
छोट्याशा कढईत तेल तापत ठेवते
त्यात छोटासा कणकेचा गोळा घालते
गोळा वर आला की तेल तापलं म्हणते
पहिली पुरी त्यात तळायला घेते
झटकन पुरी फुगायला लागते
खाणाऱ्यांची रांग लगेच लागते
"मला मोठी पुरी" ठकू सांगते
दिलेली पुरी लगेच संपवते
पुरी ओ पुरी, तू फुगशील का बरी
बरं झालं बाई तू फुगलीस हा बरी
नाहीतर माझी तारांबळ उडाली असती भारी
-धनश्री

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...