Wednesday, October 10, 2018

एवढी मोठी झालीस तू धनू ?

मनीषा कोरडे लिहीतात, (http://www.esakal.com/saptarang/manisha-korde-write-navratri-article-saptarang-148206 )
"नवरात्र म्हणजे स्त्रीला स्वतःची जाणीव होण्याचाही जागरच. त्यासाठी खेळू हे नऊ खेळ. स्वतःलाच स्वतःची ओळख करून देऊ आणि आपल्यामधल्या शक्तींचीही ओळख करून घेऊ..

१ला खेळ-
1. लहानपणीचा स्वतःचा एखादा फोटो उकरून काढावा आणि ती जी लहान मुलगी आहे, तिच्याकडं माया-ममतेनं बघावं. त्या अजाण अबोध दिवसांपासून ते आजवरच्या तिच्या प्रवासाचं कौतुक करावं. याचा अर्थ खूप जुन्या गोष्टी आठवत बसायच्या, असा नाही, तर त्या फोटोकडं बघून किंवा फोटो नसेल, तर मनात प्रतिमा आणून "छान, मस्त मोठी झालीस गं तू, पूर्वी काही कळायचं नाही तुला, आज किती शहाणी झालीस,' एवढंच म्हणायचं आहे. भूतकाळातल्या भूतांना शितं घालायची नाहीत ("मला यानं मारलं', "कमी मार्क मिळाले' असं डिटेलिंग करत बसायचं नाही). ज्या अस्तिक आहेत, त्यांनी त्या आपल्या छोटेपणातल्या मुलीला आशीर्वाद दिले तरी चालतील. ज्या नास्तिक आहेत त्यांनी त्या छोट्या लेकराचं कौतुक केलं तरी पुरे!

मुद्दा काय आहे? मुद्दा स्वतःत डोकावण्याचा आहे. ते होतंय का? या निमित्तानं ही जी एक जागा तयार होते आहे स्त्रियांसाठी- ती अनमोल आहे- तिचा पूरेपूर वापर आपण करतोय की नाही, हे बघणं महत्त्वाचं!
नऊ दिवसांचे नऊ नवे खेळ मी तुम्हाला सुचवणार आहे. आपण हे करून बघूयात का? मी तरी करणार आहे. तुम्ही ते केलंत, तर मजा येईल. "

या खेळानिमित्त मी माझ्या लहानपणीच्या आठवणी third person मधे लिहिल्या आहेत . लिहिण्यासारखं खूप आहे , पण आता थोडक्यातच संपवलंय.

एवढी मोठी झालीस तू धनू ?

अगं ,ती फोटोतली छोटी धनू ती तूच का ? दिवस कसे फटाफट जातात नाही ? तू एवढी मोठी  झालीस यावर  विश्वासच बसत नाही आहे माझा . लहान असताना तुला नटायची किती आवड होती . आणि हो , अभ्यासू आणि हुशार तर तू पहिल्यापासूनच होतीस .त्यामुळे जेव्हा तुला VJTI  प्रवेश मिळाला , तेव्हा मला अजिबात नवल वाटलं नाही . घरच्यांचं उत्तम मार्गदर्शन, तुझी मेहनत आणि हुशारी सगळ्याचं जणू काही ते फळ होत.

तुला आठवतं का पहिल्या प्रयत्नात तुला IIM मिळालं नव्हतं तेव्हा तू किती निराश झाली होतीस ? नंतर शिक्षकांच्या , आईवडिलांच्या समजावण्याने तू परत जोमानं तयारी केलीस. "आपण कर्म करत राहावे , फळाची  अपेक्षा करु नये" , ही विचारधारा मनाशी बाळगून तू खऱ्या अर्थानं प्रयत्न केलास. तुला त्या वर्षी यश मिळालच . IIM हॉस्टेलमध्ये एकटी कशी राहशील याचीसुद्धा तुला धाकधूक होतीच. पण तेही तू पार पाडलस की . Placement, CGPA या चक्रातून बाहेर पडलीस.

तुला लग्न होईपर्यंत कुठं काही फारसा स्वयंपाक येत होता? लग्नानंतर मात्र तू करत गेलीस आणि तुला सगळं जमत गेलं . अर्थात सुरुवातीचा काळ  कठीण होताच. सुरुवात वरण भात बनवण्यापासून केलीस आणि आता चक्क सगळा स्वयंपाक तू करु शकतेस. तू कोणावरही त्याबाबतीत अवलंबून नाहीस.

 स्वरा झाल्यवर तिचा बंगलोरला सांभाळ कसा होईल यांची काळजी होतीच न गं तुला. त्यावेळेलाही‌ तुझ्यामागे  आपली माणसं खंबीरपणे उभे राहिले आणि तुझी काळजी मिटली. 

आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक कठीण प्रसंग आले .त्यांना तू किती समर्थपणे तोंड दिलंस की नाही ?

आजीचे संस्कार पाळत गेलीस , प्रमाणिकपणे वेळच्यावेळी आणि मन लावून काम केलंस. बऱ्याचदा यश आलं, काहीवेळा अपयशही आलं. तू मात्र तुझे प्रयत्न चालू ठेवलेस.  या वाटचालीत साथ देणारी छान माणसं तुला भेटली.

कधीतरी असाच आपलं लहानपणीचा फोटो बघत जा, काय काय केलंस याचा आढावा घे . बघ कसं मस्त वाटेल तुला. अशीच मोठी हो, माझे आशिर्वाद तुझ्यासोबत कायम आहेत .

-धनश्री

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...