Friday, August 4, 2017

पवाईमार्गे जाताना...

सध्या माहेरी आहे . माझी आई मालाडला राहते आणि माझी नोकरी ऐरोलीला आहे. आमची ऑफिसची बस पवईमार्गे ऐरोलीला जाते. माझी सर्वात पहिली नोकरी पवईला होती. तेव्हासुद्धा आमची बस याचमार्गाने जायची. पवई म्हटलं की त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात.पहिल्या नोकरीचं महत्त्व काही वेगळंच असतं. मी तिकडे तीन वर्ष काम केलं. MBA साठी प्रवेश मिळाल्यावर नोकरी सोडली. नोमुराने मला अनेक गोष्टी दिल्या. माझा तो पहिला "corporate " अनुभव होता. एका प्रख्यात investment bank मध्ये काम कसं चालतं ते कळलं. वेगवेगळ्या अनुभवांनी समृद्ध झाले. सहकाऱ्यांशी छान मैत्री झाली. काही मित्र-मैत्रिणींशी तर अजून संपर्कात आहे. नोकरीमुळे जो आर्थिक धनलाभ झाला त्याने माझं MBA शिक्षण होण्यात खूप मदत झाली. मला कर्ज घ्यावा लागला नाही.नोमुराचं कॅन्टीन तर अगदी सुरेखचं होतं. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आणि वैविध्यपूर्ण खाणं. त्याचा मेनू आदल्या आठवड्यातच ठरलेला असायचा आणि तो आम्हाला आमच्या इंट्रानेट वर मिळायचा. नोमुरा मध्ये प्रत्येक गोष्टीला एक शिस्त होती. तीन वर्षात एकदाही आमची ऑफिसची बस कधी ५ मिनिटंसुद्धा उशिरा आली नाही .कुठल्याही वेळेत काही बदल होणार असेल तर तो आधीच कळवला जायचा.
पवईला जाऊन मस्त खाऊया, ते दिवस परत जगूया असं खूपदा वाटत होतं. पण कामाच्या व्यापात ते काही जमलं नाही. त्यामुळे आज जेव्हा पवाईमार्गे ऑफिसला जात होते तेव्हा त्या पूर्ण प्रवासात जणू काही मी ते दिवस जगत होते.पवईलेक अजूनच सुंदर वाटत होता. नुसतं त्या दृश्याकडे बघून डोळ्यात कायमचं टिपून ठेवावं असं वाटत होतं. काही फोटोही काढले मग.एखाद्या जागेशी आपल्या किती आठवणी जडलेल्या असतात नाही? मग ती नोकरीची जागा असली तरीसुद्धा.
--धनश्री


No comments:

Post a Comment

Faith

  She kept going no matter how tough the days Failures kept coming her way Faith in herself or self - belief call what you may 'I wil...