Tuesday, March 13, 2018

तू एवढं छान मराठी कसं लिहितेस ?



I won prize in the Marathi Elocution Competition conducted by Dadar Bhagini Samaj. [ speech for that competition here- http://dsaidso.blogspot.in/2018/02/blog-post_18.html] I also won a consolation prize in the extempore competition. Sharing the pictures of the prizes I received at the hands of Advocate Ujwal Nikam. Dedicating this prize to my parents and aunt who developed and nurtured our interest in reading and writing. A lot of people ask me how come I write in Marathi when my medium of instruction was English . A brief story about that below.
तू एवढं छान मराठी कसं लिहितेस ?" असं मला काही लोकं विचारतात. खरं सांगायचं तर माझे विचार मी साध्या सोप्या मराठीत व्यक्त करते एवढंच . तरीही जेव्हा माझ्या मराठीबद्दल लोक मला प्रश्न विचारतात , तेव्हा मी मराठी कसं शिकले हे सांगावंसं वाटतं . माझ्या बाबांना चार मोठ्या बहिणी , त्यातल्या तीन शिक्षिका. माझी सर्वात मोठी आत्या आमच्या वरच्या माळ्यावर राहायची, आणि एक आत्या आमच्या बरोबर. माझी शाळा इंग्लिश माध्यमाची होती आणि आम्हाला शाळेत तिसरीपासून मराठी होतं . माझी मोठी आत्या दररोज माझ्याकडून मराठी अक्षरं , बाराखडी लिहून घ्यायची. कविता म्हणून घ्यायची, पाठांतर करून घ्यायची. त्यावेळेला तिचं वय ६० वर्ष होतं . आयुष्यात पहिल्यापासून तिने खूप कष्ट काढले होते- खेड्यात नोकरी, मग त्यानंतर मुंबईत येऊन नोकरी, मुलगी २ वर्षाची असताना नवरा गेल्यामुळे तिची जबाबदारी अशा अनेक जबाबदाऱ्या सतत पार पडल्या होत्या. मग निवृत्तीनंतर ती पूर्णपणे आराम करूया असं म्हणू शकली असती. असं न म्हणता तिने आम्हाला शिकवलं , आम्हाला रोज शाळेत अगदी वेळेवर पोचवलं . माझी मीना आत्याने मला मराठी स्पर्धेत भाषण लिहायला खूप मदत केली. कुठल्याही निबंध , वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर माझ्यापेक्षा तिला उत्साह असायचा. स्पर्धेचा विषय आला कि ती मला त्या विषयावरची लायब्ररीमधून पुस्तकं आणून द्यायची . त्यातले संबंधित पृष्ठक्रमांक सांगायची . मग त्यानुसार मी भाषण लिहायचे . ते ती अधिक सुधारायची. पण भाषण/ निबंध लिहिण्यात पहिल्यापासून माझा सहभाग असायचा. त्यामुळे मी आता स्वतःहून लिहू शकते. हा आमविश्वास लहानपणापासूनच माझ्या आत्यांमुळे माझ्यात घडत गेला. कुठलीही नवी गोष्ट शिकायची, पडेल ते काम करायचं आणि विधायक काम करत राहायचं असे आमच्यावर संस्कार होते. सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या आत्या मला मराठी शिकवतात म्हणून आपली मुलं आपल्या नणंदांच्या जवळ जातील अशी असुरक्षितता माझ्या आईला कधीच वाटली नाही. आई आम्हाला इंग्लिश शिकवायची, त्याचे निबंध लिहून द्यायची,अनेक गोष्टी आणि विषय शिकवायची. बाबा गणित शिकवायचे, आमच्या शाळेच्या प्रोजेक्ट मध्ये मदत करायचे. आपल्या भाचीला आपण एवढं का शिकवावं , नाहीतरी ती आई बाबांचंच नाव लावणार न असं माझ्या आत्यांना सुद्धा कधी वाटलं नाही. माझी कालिंदी आत्या तर मला प्रत्येक वेळेला आठवण करून सांगते, तुला लिहायला आवडतं ना तर लिही, डोक्याला चालना मिळते.
महिलादिनानिम्मित काही लिहिलं नव्हतं , पण आज हे लिहून समारोप करते- माझ्या आत्या आणि आईने आम्हाला घडवताना आमचं हीत बघितलं. आम्ही मोठे झालो तर त्याचं श्रेय कोणाला मिळेल असा ego issue मध्ये कधीच आणला नाही. त्यांच्यात तो समजूतदारपणा आणि आपुलकी होती. घरातल्याघरात राजकारण नव्हतं. कित्येक घरात जेव्हा त्यांच्या घरातच कोण काय करतं आणि कोणाला त्याचं श्रेय मिळतं यावरून स्पर्धा असते. मी स्वतःला भाग्यवान समजते असं आंतरिक राजकारण आमच्या घरात नसल्यामुळे आम्ही बाहेरच्या स्पर्धेला सामर्थ्याने तोंड देऊ शकतो.
माझ्या मावशीने मला भगिनी समाज मध्ये वक्तृत्व स्पर्धा असल्याबद्दलचं सांगितलं. आणि त्या स्पर्धेत मला दोन बक्षीसं मिळाली. त्याचे फोटो share करतेय.
- Dhanashree

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...